मूल : राज्यातील विद्यापीठ कर्मचारी व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या प्रलंबीत असलेल्या प्रमुख सहा मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने आंदोलनाचा पावित्रा स्विकारला असून २ फेब्रुवारी पासून विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी अवकाश काळात निदर्शने करण्यांत येणार आहेत. १५ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी काळया फिती लावून कामकाज करणार असून १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत. या काळात शासनाने सेवक संयुक्त कृती समितीच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास २० फेब्रुवारी 2023 पासून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ व संलग्नीत महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर जातील. असा इशारा दिला आहे. यानुषंगाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील कर्मचाऱ्यांशी बेमुदत संपाबाबत चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी सोमवार दिनांक १३ फेबुवारी २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे सभागृहात सभेचे आयोजन केले आहे. आयोजीत सभेला महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रा.जा.बढे, सरचिटणीस डाॅ.आर.बी.सिंह आणि सेवक संयुक्त कृती समितीचे मुख्य संघटक अजय देशमुख आदि पदाधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. आयोजीत सभेला चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयातील वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी मोठया संख्येनी उपस्थित राहावे. अशी विनंती चंद्रपूर गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत रंदई, कार्याध्यक्ष लोमेश दरडे आणि महासचिव अरूण जुनघरे यांनी केले आहे.
Latest article
मूल बस स्थानका मधील महीला प्रसाधन गृहात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य, सुधारणा न झाल्यास...
मूल : प्रवासी आणि बसेसच्या गर्दीने भरून राहणा-या येथील बस स्थानकाच्या भिंतीची रंगरंगोटी करून प्रवाश्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असतांना दुसरीकडे मात्र येथील प्रसाधन...
तलावाची पाळ फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काँग्रेसची...
मूल : अतीवृष्टीमूळे तालुक्यातील दाबगांव येथील तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचे मोठया प्रमाणांत नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई...
अतिवृष्टीचे तात्काळ मौका पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा-सर्वपक्षीय नेत्यांची मागणी. प्रशासनाच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे...
मूल : संततधार पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून शेतातील पीक उध्वस्त झाले आहे. शेतातील यंत्र सामुग्री, खत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे...