मूल : पोलीस स्टेशन आणि पोस्ट आँफीस लगतच्या गोगीरवार यांच्या मालकीच्या श्री दत्त साडी सेंटरला रात्रो अंदाजे ११ वा. चे सुमारास आग लागल्याने जवळपास ६० ते ६५ लाखाची हानी झाल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. नेहमी प्रमाणे रात्रो ८.३० वा. सुमारास दुकान मालक बंडु गोगीरवार दुकान बंद करून घरी पोहोचले, दुकाना समोर वास्तव्याने असलेले माजी नगरसेवक प्रशांत समर्थ यांना मध्यरात्री १ वाजताचे सुमारास श्री दत्त साडी सेंटरला आग लागल्याची माहिती होताच त्यांनी तातडीने नगर परिषद व पोलीस प्रशासनास माहिती देवुन अग्नीशमन पथकास पाचारण केले. दुकान मालक बंडु गोगीरवार यांनाही बोलावुन घेत दुकानाचे शटर उघडले तेव्हा आगीत दुकानाच्या तळमजल्यामध्यें असलेले बहुतांश महागडी कापड आगीच्या भक्षस्थानी सापडल्याचे दिसले. घटनास्थळी पोहोचलेल्या मूल आणि सावली नगर परिषदेच्या अग्नीशमन पथकासह स्थानिक पोलीस कर्मचा-यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. दुकानात लावलेल्या इनव्हर्टरमूळे अंदाजे ११ वा. नंतर आग लागल्याची शंका दुकान मालक बंडु गोगीरवार यांनी व्यक्त केली असून लागलेल्या आगीत त्यांचे जवळपास ५५ ते ६० लाखाची हानी झाल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे. आग लागल्याची माहिती होताच तातडीने स्थानिक अग्नीशमन पथक पोहोचल्याने दुकानाच्या वरच्या माळयावरील कापड साहित्य सुरक्षीत राहीले. अन्यथा मोठी वित्त हानी झाली असती. आग लागल्याची माहिती होताच घटनास्थळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर, ठाणेदार सतिशसिंह राजपुत, पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम राठोड, माजी नगरसेवक प्रशांत समर्थ, अजय गोगुलवार यांचेसह कर्मचारीवृंद उपस्थित झाले होते.
Latest article
मूल बस स्थानका मधील महीला प्रसाधन गृहात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य, सुधारणा न झाल्यास...
मूल : प्रवासी आणि बसेसच्या गर्दीने भरून राहणा-या येथील बस स्थानकाच्या भिंतीची रंगरंगोटी करून प्रवाश्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असतांना दुसरीकडे मात्र येथील प्रसाधन...
तलावाची पाळ फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काँग्रेसची...
मूल : अतीवृष्टीमूळे तालुक्यातील दाबगांव येथील तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचे मोठया प्रमाणांत नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई...
अतिवृष्टीचे तात्काळ मौका पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा-सर्वपक्षीय नेत्यांची मागणी. प्रशासनाच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे...
मूल : संततधार पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून शेतातील पीक उध्वस्त झाले आहे. शेतातील यंत्र सामुग्री, खत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे...