मूल – मूल-चंद्रपूर रेल्वे मार्गावर मूल स्टेशन पासून एक किलोमीटर अंतरावर नर चितळाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबतची माहिती पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी वन कर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांना दिली. माहिती मिळताच संजीवन संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे, वन विभगाचे क्षेत्र सहाय्यक मस्के, प्रशांत मुत्यारपवार, वनमजूर विशाल टेकाम, आशीष बोरकर हे घटनास्थळी जाऊन चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कु.प्रियंका वेलमे यांचे मार्गदर्शनात घटनेचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी संदिप छौंकर यांनी चितळाचे शवविच्छेदन केले व नंतर त्याचे दहन करण्यात आले. वन्य प्राण्यांचे अशाच प्रकारे अपघात होत असल्याने वनातील प्राणी कमी होत असून जंगलातील त्याची शिकार मिळत नसल्याने वाघ गाव आणि शेतीकडे येत असल्याने मानवावर वाघाचे हल्ले होणाचे घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन मंत्रालयाने वनाला संरक्षण ताराची जाळी लावावी अशी मागणी ग्रामस्थांकडून व शेतकरी बांधवांनी केली आहे. असे केले तर भविष्यात मानव व वन्यप्राणी सुरक्षित राहतील.
Latest article
मूल बस स्थानका मधील महीला प्रसाधन गृहात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य, सुधारणा न झाल्यास...
मूल : प्रवासी आणि बसेसच्या गर्दीने भरून राहणा-या येथील बस स्थानकाच्या भिंतीची रंगरंगोटी करून प्रवाश्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असतांना दुसरीकडे मात्र येथील प्रसाधन...
तलावाची पाळ फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काँग्रेसची...
मूल : अतीवृष्टीमूळे तालुक्यातील दाबगांव येथील तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचे मोठया प्रमाणांत नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई...
अतिवृष्टीचे तात्काळ मौका पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा-सर्वपक्षीय नेत्यांची मागणी. प्रशासनाच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे...
मूल : संततधार पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून शेतातील पीक उध्वस्त झाले आहे. शेतातील यंत्र सामुग्री, खत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे...