मूल : मराठी विषयाच्या पाठयपुस्तकातील बालसभा हया पाठाचे थेट बालसभेत रूपांतर करून विद्याथ्र्यांना सभा कशी आयोजीत करायची. याचे प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करण्याचा नवा उपक्रम स्थानिक नवभारत कन्या विद्यालयात सादर झाल्याने विद्याथ्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे. स्थानिक नवभारत कन्या विद्यालयाच्या शिक्षीका मंजुषा अशोक येरमे (पंधरे) यांनी इयत्ता सहावीच्या विद्याथ्र्यांना बालसभा हा पाठ शिकवतांना त्यांनी वर्गखोलीत प्रत्यक्ष बालसभाच सादर केली. इयत्ता दहावी मध्यें शिकणारी आशा बावनवाडे हया विद्यार्थीनीस सभेचे अध्यक्षस्थान दिले तर वर्ग सातवीची अक्षरा गुलभमवार आणि वर्ग सहावीची रिया झाडे यांना प्रमुख अतिथी म्हणून मंचावर विराजमान करण्यांत आले. त्यानंतर सभेच्या संचालनापासून प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन कश्या प्रकारे मानले पाहिजे, याबाबत विद्याथ्र्यांना पुर्वप्रशिक्षण देवून मंजुषा येरमे यांनी बालसभेला प्रारंभ केला. सभेच्या प्रारंभी मंचावरील मान्यवर विद्याथ्र्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. विद्यार्थीनी सेजल मारकवार ही प्रास्ताविक केले तर श्रेया श्रीरामे, ईश्वरी आंबटकर, रिया झाडे आणि अक्षरा गुलभमवार यांनी बालसभेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतीबा फुले यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकला. आशा बावनवाडे हीच्या अध्यक्षीय मनोगताने बालसभेची सांगता झाली. सभेचे स सुत्रसंचालन रूचीता लेनगुरे हीने तर आबा आंबटकर हीने आभार प्रदर्शन केले. बालसभेचे मुल्यांकन विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर पुराम, शिक्षक प्रफुल निमगडे, धिरज धोडरे, अर्चना बेलसरे, उज्वला चहांदे आणि तृप्ती रामटेके यांनी केले. बालसभा पाठाचे प्रात्याक्षीकासह सादरीकरण झाल्यानंतर पर्यवेक्षक पुराम यांनी बालसभा पाठाचे सादरीकरण विद्यार्थीनींना उत्तम मार्गदर्शक आणि संचालनकर्ती बनण्यास महत्वाचे ठरू शकते. असे मत व्यक्त केले. बालसभा पाठाचे प्रत्यक्ष सादरीकरणासह अध्यापन केल्याने विद्यार्थीनींनी शिक्षीका मंजुषा येरमे यांचे प्रती आभार व्यक्त करून समाधान मानले.
Latest article
मूल बस स्थानका मधील महीला प्रसाधन गृहात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य, सुधारणा न झाल्यास...
मूल : प्रवासी आणि बसेसच्या गर्दीने भरून राहणा-या येथील बस स्थानकाच्या भिंतीची रंगरंगोटी करून प्रवाश्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असतांना दुसरीकडे मात्र येथील प्रसाधन...
तलावाची पाळ फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काँग्रेसची...
मूल : अतीवृष्टीमूळे तालुक्यातील दाबगांव येथील तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचे मोठया प्रमाणांत नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई...
अतिवृष्टीचे तात्काळ मौका पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा-सर्वपक्षीय नेत्यांची मागणी. प्रशासनाच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे...
मूल : संततधार पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून शेतातील पीक उध्वस्त झाले आहे. शेतातील यंत्र सामुग्री, खत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे...