मूल – केंद्रातील भाजपचे मोदी सरकार ६ नोव्हेंबर रोजी नोटा बंदीचा चुकीचा निर्णय घेतल्यामुळे देशातली अर्थव्यवस्था कोलमडली त्यामुळे उद्योग धंदे गेले लाखो तरुण बेरोजगार झाले करीता ६ नोव्हेंबर हा दिवस देशात काळा दिवस पाळून मुल तालुका व शहर काँग्रेस, युवक काँग्रेस तर्फे काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे देत काळा दिवस पाळला. मोदी सरकारच्या दडपशाहीने देशाची अर्थ व्यवस्था ढासळली असुन लाखो तरुण बेरोजगार झालेत. हा तरूणांवर अन्याय असल्याने त्याचा निषेध करण्यात आला. काळ्या फिती लावुन मोदी सरकार हाय हाय म्हणत जाहीर निषेध केला. याप्रसंगी तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष तथा माजी न.प.उपाध्यक्ष राकेश रत्नावार, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र कन्नमवार, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष किशोर घडसे, नवनियुक्त तालुका अध्यक्ष गुरुदास गुरनुले, राज्य ओबीसी काँग्रेस सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेडीवार शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील शेरकी,युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, ज्येष्ठ नेते माजी प्राचार्य बंडूभाऊ गुरनुले, माजी संचालक डॉ.पद्माकर लेनगुरे, सोसायटी संचालक विवेक मुत्यलवार, कोसंबी सरपंच रवींद्र कामडी, ग्रामीण युवा नेते प्रशांत उराडे, सुरेश फुलझेले, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, कैलाश चलाख, अतुल गोवर्धन, मनोज दामल्लीवर यांचे सह शहर व ग्रामीण काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Latest article
मूल बस स्थानका मधील महीला प्रसाधन गृहात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य, सुधारणा न झाल्यास...
मूल : प्रवासी आणि बसेसच्या गर्दीने भरून राहणा-या येथील बस स्थानकाच्या भिंतीची रंगरंगोटी करून प्रवाश्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असतांना दुसरीकडे मात्र येथील प्रसाधन...
तलावाची पाळ फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काँग्रेसची...
मूल : अतीवृष्टीमूळे तालुक्यातील दाबगांव येथील तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचे मोठया प्रमाणांत नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई...
अतिवृष्टीचे तात्काळ मौका पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा-सर्वपक्षीय नेत्यांची मागणी. प्रशासनाच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे...
मूल : संततधार पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून शेतातील पीक उध्वस्त झाले आहे. शेतातील यंत्र सामुग्री, खत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे...