पालकमंञ्याच्या सकारात्मक प्रतिसादाने तालुक्यातील शेतकरी समाधानी, विविध विषयांवर सकारात्मक चर्चा

89

मूल : मागील काही महिण्यापासुन तालुक्यात वन्यप्राण्यांनी अनेक शेतक-यांचे जीव घेतले तरीही प्रशासनाला जाग आल्याचे दिसत नाही. त्यामूळे सुस्तावलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी मूल तालुक्यातील काही शेतक-यांनी क्षेत्राचे आमदार तथा राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची भेट देवुन विविध समस्यांचे निवेदन सादर केले, यावेळी नामदार मुनगंटीवार आणि शेतक-यांमध्ये सकारातमक चर्चा झाली.
यावेळी झालेल्या चर्चेत मागेल त्या शेतक-याला शासनामार्फत १०० टक्के अनुदानावर सौर कुंपन देण्यात यावे. आणि तालुका स्तरावर सौर कुंपन मशीनचे दुरूस्ती केंद्र उभारण्यात यावे, वन्यप्राण्याच्या हल्लातील बाधीत गावाना प्राधान्य देवुन जंगलासभोवताल सौर कुंपन उभारण्यात यावे. जंगलाजवळील शेतशिवार असलेल्या शेतक-यांना उच्च प्रतिच्या चार्जिंग बॅटरी उपलब्ध करून देण्यात यावे. सेंद्रीय शेतीला चालणा देण्यासाठी तालुका स्तरावर सेंद्रीय खत प्रकल्प उभारण्यात यावे. टाटा ट्रस्ट प्रकल्पातुन वगळयात आलेल्या गावांचाही समावेश करण्यात यावे. भाजीपाला उत्पादकांसाठी मूल शहरात भाजीपाला मार्केटची निर्मीती करण्यात यावे, राज्यपुरस्कृत कृषी विज्ञान केंद्राची निर्मीती करून तज्ञ शास्त्रज्ञांची नियुक्ती करावी व आधुनिक शेतीला चालणा देण्यात यावे. सेंद्रिय शेती करणा-या शेतक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे अनुदान देण्यात यावे. टाटा ट्रस्टची व्याप्ती वाढवुन संरक्षीत शेतीला चालणा देण्यासाठी शेडनेट, पॉली हाऊस शेतक-यांना ९०  टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात यावे.
मानव-वन्यप्राण्याचे होणारे हल्ले टाळण्यासाठी तालुकास्तरावर स्थानिक नागरीकांची उपाय योजना समिती गठीत करण्यात यावे. आणि स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या निकषात बदल करून शेतक-यासोबतच शेतमजुरांचाही समावेश करण्यात यावा यासंबधाने नामदार मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करण्यात आली, यासमस्या आपण सोडविण्याबाबत आश्वासन दिले.
शेतक-यांच्या शिष्टमंडळात भाजीपाला उत्पादक मंगेश पोटवार, प्रशांत मेश्राम, प्रभाकर सोनुले, गिरीधर वाघाडे, मनोज चावरे, उमाजी पाटील चुधरी, दामोधर सोनुले, विजय कन्नाके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here