मूल : एकात्मीक बाल विकास प्रकल्प अंतर्गत राजोली क्षेत्रातील अंगणवाडी सेवीका आणि मदतनीसांच्या सहकार्याने राष्ट्रीय पोषण आहार अभियान नुकताच साजरा करण्यांत आला. तालुक्यातील आकापूर येथील अंगणवाडी केंद्रात पार पडलेल्या राष्ट्रीय पोषण आहार अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन आकापूर येथील सरपंच भाष्कर हजारे यांचे हस्ते झाले. एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी निलेश चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापीका कुलोत्पना कुळमेथे, पोलीस पाटील रमेश येरमे, शिक्षक सुधीर चिंतलवार आणि राजोली क्षेत्राच्या पर्यवेक्षीका लिना जंबुलवार उपस्थित होत्या, कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन आणि दिपप्रज्वलन करून केले. यावेळी श्रावस्ती समीर कुंभारे हया बालकीकेने नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेवीका स्वाती तोडासे यांनी केले, यावेळी मनोगत व्यक्त करताना सरपंच भाष्कर हजारे, पोलीस पाटील रमेश येरमे आणि मुख्याध्यापीका कुलोत्पना कुळमेथे यांनी पोषण आहाराचे महत्व सांगीतले. कार्यक्रमा दरम्यान दोन गटात सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली. सहा महिणे ते तीन वर्ष पर्यंतच्या वयोगटात रियांश गणेश हजारे हा बालक प्रथम तर प्रणीता जितेंद्र आत्राम ही ३ ते ६ वयोगटात प्रथम क्रमाकाचे मानकरी ठरले. पोषण आहार अभियानातंर्गत क्षेत्रातील अंगणवाडी सेवीका आणि मदतनीसांनी विविध पोषण आहाराचे उत्कृष्ठ सादरीकरण केले होते. संध्याकाळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापीका कुलोत्पना कुळमेथे यांचे हस्ते विजेत्या बालकांना बक्षीसाचे वितरण करण्यांत आले. कार्यक्रमाचे संचलन तनुजा मोगरे आणि आभार सुरभी राऊत यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील पालकवृंद मोठया संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षिका लिना जंबुलवार यांचे मार्गदर्शनात राजोली क्षेत्रातील अंगणवाडी सेवीका आणि मदतनीस यांनी परिश्रम घेतले.
Latest article
मूल बस स्थानका मधील महीला प्रसाधन गृहात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य, सुधारणा न झाल्यास...
मूल : प्रवासी आणि बसेसच्या गर्दीने भरून राहणा-या येथील बस स्थानकाच्या भिंतीची रंगरंगोटी करून प्रवाश्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असतांना दुसरीकडे मात्र येथील प्रसाधन...
तलावाची पाळ फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काँग्रेसची...
मूल : अतीवृष्टीमूळे तालुक्यातील दाबगांव येथील तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचे मोठया प्रमाणांत नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई...
अतिवृष्टीचे तात्काळ मौका पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा-सर्वपक्षीय नेत्यांची मागणी. प्रशासनाच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे...
मूल : संततधार पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून शेतातील पीक उध्वस्त झाले आहे. शेतातील यंत्र सामुग्री, खत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे...