मूल: अखिल भारतीय भिक्खु संघ शाखा मूलच्या वतीने बुध्दगिरीचा १८ वा वर्धापन दिन आणि भिक्खु संघवंश थेरो यांचा १६ वा वर्षापास समाप्ती महोत्सव नुकताच संपन्न झाला. चंद्रपूर मार्गावरील बुध्दटेकडी वर संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट प्रदेश भिक्खु संधाचे सचिव तथा विपश्यना आचार्य डाॅ. भदंत सुमनवन्नो महाथेरो होते. यावेळी भिक्खु आनंद थेरो, भिक्खु नंद थेरो, भिक्खु सुमंगल, भिक्खु रत्नमनी, भिक्खु मैद्वी बोधी, भिक्खु धम्मप्रकाश संबोधी आदि मान्यवर उपस्थित होते. वर्धापन दिनाची सुरूवात ध्वजारोहणाने झाली. आयोजक भिक्खु संघवंश थेरो यांनी बुध्दगिरीच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात भिक्खु संघाकडून शिलग्रहण, सुर्यपठण, धम्म देसना आदि कार्यक्रम संपन्न झाले. संध्याकाळी आवाज निळया पाखरांचा बुध्द भिम गितांचा प्रबोधनात्मक आंबेडकरी जलसाचा कुमूद रायपुरे आणि संचाचा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. वर्धापन दिना निमित्त पार पडलेल्या संपुर्ण धार्मिक कार्यक्रमाला जिल्हयाभरातील बौध्द समाज बंधु‘-भगिनी हजारोच्या संख्येनी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भिक्खु संघवंश थेरो यांचे मार्गदर्शनात काजु खोब्रागडे, विनोद निमगडे, शम्मी डोर्लीकर, पुरूषोत्तम साखरे, सुजीत खोब्रागडे, अतुल गोवर्धन, बालु दुधे, संतोष घुटके, अजय रंगारी, अनिकेत वाकडे, विशाल बंसोड, ऋतीक शेंडे, पुजा रामटेके, गिता देवगडे, सपना लाकडे, यशोधरा वाकडे, संध्या भोसले, शोभा गेडाम, रूपाली गोवर्धन, अंकीता खोब्रागडे आदिंनी परिश्रम घेतले.
Latest article
मूल बस स्थानका मधील महीला प्रसाधन गृहात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य, सुधारणा न झाल्यास...
मूल : प्रवासी आणि बसेसच्या गर्दीने भरून राहणा-या येथील बस स्थानकाच्या भिंतीची रंगरंगोटी करून प्रवाश्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असतांना दुसरीकडे मात्र येथील प्रसाधन...
तलावाची पाळ फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काँग्रेसची...
मूल : अतीवृष्टीमूळे तालुक्यातील दाबगांव येथील तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचे मोठया प्रमाणांत नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई...
अतिवृष्टीचे तात्काळ मौका पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा-सर्वपक्षीय नेत्यांची मागणी. प्रशासनाच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे...
मूल : संततधार पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून शेतातील पीक उध्वस्त झाले आहे. शेतातील यंत्र सामुग्री, खत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे...