मूल : माजी सैनिक संघटना आणि भरारी माजी सैनिक महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक आदिवासी मूलांच्या वसतीगृहातील सभागृहात अमर विरांच्या सन्मानार्थ कारगील विजय दिन साजरा करण्यांत आला. वसतीगृहाचे गृहपाल प्रशांत फरकाडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष एकनाथ गडेकर, ज्येष्ठ सैनिक मारोतराव कोकाटे, सुनिल नगराळे, सचिव बाबा सुर, सल्लागार सहदेव रामटेके, भरारी महीला बचत गटाच्या अध्यक्षा अंजली सुर आणि उपाध्यक्ष पुष्पा जंबुलवार, प्रशांत पाटील आदि उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते कारगिल युध्दात अमर झालेल्या सैनिकांच्या अमर स्मृतीस अभिवादन करण्यांत आले. संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गडेकर यांनी कारगील युध्दात शहीद झालेल्या सैनिकांच्या बलीदानाची आठवण आणि उल्लेखनीय कामगिरी करणा-या सैनिकांच्या सन्मानार्थ कारगील विजय दिन साजरा करीत असल्याचे सांगीतले. यावेळी मान्यवरांनी कुटूंबापासून कोसो दूर राहून जीवाची तमा न बाळगता देशाच्या सिमेवर पहारा देणा-या सैनिकांमूळे देश आणि जनता सुरक्षीत जीवन असून त्यांच्या त्यागाला तोड नाही. नसल्याचे मत व्यक्त करतांना उपस्थित माजी सैनिकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचलन पुरूषोत्तम चलाख यांनी तर विजय भसारकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला बचत गटाच्या सचिव कवीता मोहुर्ले, करूणा खोब्रागडे, प्रतिभा भसारकर, उज्वला रंगारी, आशा चलाख, संदीप परचे, गावतुरे, मंजुषा कोकोटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला निमंत्रीत आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
Latest article
ईद ए मिलादच्या दिवशी घडले शहरवासीयांना शांततेचे दर्शन
मूल : ईद ए मिलाद सण स्थानिक मुस्लीम बांधवांकडून मोठया उत्साहाने साजरा करण्यांत आला. सकाळी 9 वाजता मस्जीद कमेटीचे अध्यक्ष अँड. दाऊद शेख, सचिव...
नरभक्षक वाघाच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी घेतली मुख्य वनसंरक्षकांची भेट, मागण्यांची पुर्तता न केल्यास आंदोलन...
*नरभक्षक वाघाच्या दहशतीत असलेल्या ग्रामस्थांनी घेतली मुख्य वनसंरक्षकांची भेट*
*मागण्यांची पुर्तता न केल्यास आंदोलन करू. संतोषसिंह रावत यांचा इशारा*
मूल : शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशत पसरविणाऱ्या...
पंधरा दिवसात पाच जणांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त करावा, संतोषसिंह रावत यांचा आंदोलनाचा...
मूल : पंधरा दिवसाच्या कालावधीत तालुक्यातील पाच जणांचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला. त्यामूळे जनसामान्यांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली असून जीवघेण्या वाघांचा बंदोबस्त करावा. अशी...