मूल परिसरात विद्युत प्रवाहाने अस्वलाचा मृत्यू, शेतक-यास घेतले ताब्यात

72

मूल : तालुक्यातील अंतरगाव पारडवाही येथील शेतात वन्य प्राण्यापासुन रक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहाने अंदाजे दोन वर्षाच्या नर आस्वलाचा मृत्यू झाला. दरम्यान अवैद्य कृत्य करून अस्वलाचा बळी घेणाऱ्या शेतकऱ्यास वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

मूल येथील शेतकरी सूधीर कावळे यांनी स्वमालकीची शेती मूल येथील शेतकरी गोपीनाथ मंगरू शेंडे याला ठेका पध्दतीने दिली. गोपीनाथ शेंडे यांनी वन्यप्राण्यापासुन मका पीकाच्या संरक्षणा साठी महावितरणच्या पोलवरून अवैद्यरित्या आकडा टाकुन शेताच्या सभोवताल तार लावुन त्यात विद्युत प्रवाह सोडला. त्याच विद्युत प्रवाहाने अस्वलाचा मृत्यू झाला. घटनेची माहीत होताच येथील क्षेत्र सहाय्यक मोरेश्वर मस्के, वनरक्षक सुभाष मरसकोल्हे व संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रभाकर धोटे आणि सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि या सर्व घटनेची माहिती विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे व चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांना देण्यात आल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी भेट दिली. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी गोपीनाथ मंगरू शेंडे याला ताब्यात घेवुन त्याचे कडुन विद्युत प्रवासासाठी वापरलेले वायर आणि आकडा टाकण्यासाठी वापरलेली काठी जप्त केली. यावेळी महावितरण मूल चे सहाय्यक अभियंता पंकज उजवने, प्राणी उपचार केंद्र चंद्रपूर चे डॉ. कुंदन पोडचलवार, क्षेत्रसहाय्यक मोरेश्वर मस्के, वनरक्षक सुभाष मरस्कोले, वनरक्षक राकेश गूरनुले व वनमजूर उपस्थित होते. मृत अस्वलाला मुल येथे आणुन शवविच्छेदन करण्यात आले व नंतर दहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here