मूल – मा.आयुक्त मानव विकास समिती नागपूर विभाग नागपूर यांची सितांगन अँग्रौ प्रोड्यूसर कंपनी लि. यांनी तालुक्यातील मारोडा येथील प्रकल्पाला भेट दिली. तालूक्यात स्थापन झालेल्या सितांगन अँग्रो प्रोड्यूसर कंपनी लि.मारोडा शेतक-याच्या शेती क्षेत्रातील अडचणी व समस्यांवर काम करीत असून कंपनीच्या ५०० सभासद शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी आणि आर्थिक विकास घडविण्यासाठी काम करीत असुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ सभासद शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहे. शासनाच्या शेतकरी उत्पादक कंपण्यांकरिता विविध योजना आहेत.कंपनीचा सिड क्लिनींग अँन्ड ग्रेडींग प्रकल्प कार्यान्वित झालेला असून अनेक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. शासकीय योजनेच्या माध्यमातून ४०० मेट्रिक टन साठवन क्षमतेचे साठवण गृहाचे १०० टक्के काम पूर्णत्वाकडे आहे .सदर प्रकल्पाचे पाहणी करीता मा. पाटील, आयुक्त मानव विकास समिती, मा. धोंगडे, जिल्हा नियोजन अधिकारी चंद्रपूर, जिल्हा मानव विकास समितीचे मनोहरे, उपसंचालक कृषी चंद्रपूर जिल्हा आणि चमू यांनी कंपनीच्या प्रकल्पस्थळी भेट देवुन समाधन व्यक्त केले. पुढील काळात स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि आर्थिक विकासाकरीता नवनविन प्रकल्प नियोजन करून प्रस्ताव सादर करण्याकरीता उपस्थित संचालक मंडळ आणि सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कंपनीच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि ब्लॅक राईस देऊन स्वागत करण्यात आला. कंपनीचे अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे यांनी प्रकल्पाबाबत संपूर्ण माहिती सादर केली. प्रा.राजेश्वर राजूरकर संचालक महा आँरगॅनिक अँन्ड रेसिड्यू-फी फार्मस असोसिएशन पुणे महाराष्ट्र तथा एस ए पी सी एल मारोडा , संचालक सूधाकर चौधरी, सत्यवान सोनूले, मुद्दमवार ,प्रा. गुलाब मोरे, डि.के.जनबंधू, म्हशाखेत्री, दिपक बोर्डावार आणि तालुका कृषी कार्यालयाचे कृषी पर्यवेक्षक ऊईके आणि कुंभारे आदी उपस्थित होते.
Latest article
मूल बस स्थानका मधील महीला प्रसाधन गृहात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य, सुधारणा न झाल्यास...
मूल : प्रवासी आणि बसेसच्या गर्दीने भरून राहणा-या येथील बस स्थानकाच्या भिंतीची रंगरंगोटी करून प्रवाश्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असतांना दुसरीकडे मात्र येथील प्रसाधन...
तलावाची पाळ फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काँग्रेसची...
मूल : अतीवृष्टीमूळे तालुक्यातील दाबगांव येथील तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचे मोठया प्रमाणांत नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई...
अतिवृष्टीचे तात्काळ मौका पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा-सर्वपक्षीय नेत्यांची मागणी. प्रशासनाच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे...
मूल : संततधार पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून शेतातील पीक उध्वस्त झाले आहे. शेतातील यंत्र सामुग्री, खत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे...