मूल – स्वच्छ व सुंदर शहर ठेवल्याने शासनाकडून विविध पुरस्कार प्राप्त होवुन नावारूपास आलेल्या मूल शहराकडे सध्यास्थितीत शहराच्या स्वच्छतेकडे कोणीही माजी पदाधिकारी यांचे व प्रशासनाचे लक्ष नसल्याने शहरात गावठी डुकरांचा हैदोस वाढल्याने शहर स्वच्छतेचे तीन तेरा वाजल्याचे मत नागरिकांनी बोलून दाखविले आहे. काही दिवसापूर्वी नगर परिषदेच्या वतीने डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी फतवा काढण्यात आला होता. डुकरे पकडण्याची मोहिमही राबविण्यात आली. परंतु मागील एक वर्षाचा कालावधी संपत आला तरी देखील डुकराचा बंदोबस्त करण्यात आला नसल्याने शहरामध्ये डुकराच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. येत्या पंधरा दिवसाचे आत हैदोस माजविणाऱ्या गावठी डुकर मालकाने आपल्या डुकरांचा बंदोबस्त करावा. अन्यथा त्यांचेविरूध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र या फतव्याचे काटेकोर पणे पालन केल्या जात नसल्याचे येथील नागरिकांचे मत आहे.अजूनही शहरात मोठ्या प्रमाणात कळपाने डुकरे सर्वञ वावरतांना दिसतात. मुख्य रस्त्यानेही फिरकताणा दिसतात. मुख्य रस्ता क्रॉस करतांना सुद्धा मोटार सायकल चे अपघात होत आहेत व याआधीही काही मोटार सायकलचे अपघातही झाले आहे. जिल्हा परिषद व खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान भोजन, खीचळी दिल्या जाते अशा शालेय परिसरात डुकरांचा कळप सततचा त्रासदायक झाल्याचेही सांगण्यात येत आहे. नगर परिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष घालून शहरात सर्वत्र होणाऱ्या डुकराच्या त्रासाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
Latest article
मूल बस स्थानका मधील महीला प्रसाधन गृहात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य, सुधारणा न झाल्यास...
मूल : प्रवासी आणि बसेसच्या गर्दीने भरून राहणा-या येथील बस स्थानकाच्या भिंतीची रंगरंगोटी करून प्रवाश्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असतांना दुसरीकडे मात्र येथील प्रसाधन...
तलावाची पाळ फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, संतोषसिंह रावत यांचे नेतृत्वात काँग्रेसची...
मूल : अतीवृष्टीमूळे तालुक्यातील दाबगांव येथील तलाव फुटल्याने शेकडो हेक्टर शेतीचे मोठया प्रमाणांत नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई...
अतिवृष्टीचे तात्काळ मौका पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा-सर्वपक्षीय नेत्यांची मागणी. प्रशासनाच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे...
मूल : संततधार पावसामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून शेतातील पीक उध्वस्त झाले आहे. शेतातील यंत्र सामुग्री, खत वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे...